दागिने | Jewellery Care | Tips and Tricks | Safety | Swati Lagu

रत्नजडित दागिन्यांची काळजी- स्वाती लागू

  दागिने हा बायकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आता हे कशापासून बनविलेले आहेत म्हणजे सोन्याचे, मोत्याचे, पोवळ्याचे, हिऱ्याचे की इतर मौल्यवान रत्नांचे आहेत, तसेच ते कुठल्या प्रकारचे आहेत, तो सोन्याचा घसघशीत हार आहे, नाजूक माळ आहे, मोत्यांचा पेशवेशाही दागिना आहे, आधुनिक प्रकारचा हार आहे, हिऱ्याचा नेकलेस, त्याचबरोबर कुडी की झुंबर की रंगीत रत्नांचे दागिने आहेत, ह्यावरून […]

आदिविनायक

आपल्याकडे गणपती हे दैवत इतके लोकप्रिय आहे की, त्याच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, स्थानाबद्दल काही ना काही कथा, कोणता ना कोणता तरी विशिष्ट आचार, प्रथा रूढ झालेली दिसते. आता हेच पाहाना. दक्षिणेत रामेश्र्वरपुरम् या शहराच्या ईशान्येला साधारण २० मैलांवर गणपतीचे एक देऊळ आहे. त्याचे तिथले नाव आहे वेय्यिगुलनाथ. श्रीरामाने सेतू बांधण्यापूर्वी ज्याची पूजा केली तोच हा विनायक. […]

आंबा | King of Fruits | Mango | Mango Lover

फळांचा राजा | ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता ‘राजा’ भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले. ​आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा […]

महाराष्ट्राच्या विकासाची नवी शक्तिस्थाने – माधव चितळे

समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. […]

मराठी भाषेचे राज्य

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात […]

विजयी माझा श्रीहनुमान !

बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. मध्वमुनीश्र्वरांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक सुंदर पद लिहिले आहे. मध्वमुनीश्र्वरांच्या इतर रचनांप्रमाणेच हे पद्सुद्धा प्रासादिक आणि मधुर असे आहे. विजयी माझा श्रीहनुमान। अंजनीनंदन […]

निवृत्ती नियोजन : केव्हा ? कसे ? कुठे ?

वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्ती नियोजनाला सुरुवात करणे म्हणजे खूप उशिरा सुरुवात करण्यासारखे आहे. निवृत्ती नियोजनाला खरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षीच सुरुवात करणे हितावह असते. निवृत्ती नियोजनाची गरज : (१) वाढलेले आयुर्मान : वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेतसेच बदललेल्या गुणवत्तापूर्ण राहणीमानामुळे सरासरी आयुष्यवाढते आहे. निवृत्तीनंतर आपल्याला २५ ते ३० वर्षे जगायचे आहे आणि तेही सन्मानाने ! […]

सुदृढ आरोग्य- संस्कृती

अलीकडेच युरोपीय देशांत फिरण्याचा योग आला. सुंदर हिरवी कुरणे व चंदेरी हिमाच्छादित डोंगरमाथे सर्वांनाच भुलवतात. पण त्याहूनही रम्य अशी काही दृश्ये माझ्या मनावर कोरली गेली. रुंद, सहा पदरी रस्ते, पादचाऱ्यांसाठी व सायकलींसाठी स्वतंत्र लेन, शिस्तबद्ध नीरव रहदारी, सार्वत्रिक स्वच्छता आणि त्याहून सुंदर म्हणजे निर्धास्तपणे कानाला संगीत लावून जॉगिंग करीत असलेल्या सर्वसाधारण महिला! सायकली चालवत रपेट […]

उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचावे कसे?

१) जेवणात कांद्याचे प्रमाण वाढवावे. शक्यतो कच्चा कांदा जास्तीत जास्त प्रमाणात खावा. २) उन्हाळ्यात तहानेने जीव बेजार होतो. कितीही पाणी प्याले तरी शोष पडल्यासारखा वाटतो. दिवसभर असे सारखे पाणी पीत राहिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. जेवण कमी होते. हे सगळे टाळण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी फक्त पेलाभर प्याले तरी दिवसभर तहानेने जीव व्याकूळ होत नाही. ३) पुष्कळांना उन्हाळा […]

निद्रानाश

झोप ही सर्व मनुष्यांना व सर्व प्राणिमात्रांना निसर्गाने दिलेली एक अमोल देणगी आहे व ती एक महत्त्वाची शारीरिक व मानसिक गरज आहे. भूक व तहान यांसारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी थोडी अधिक मेहनत किंवा कष्ट घ्यावे लागतात. परंतु झोप ही मात्र कशीही कुठल्याही जागी (बसल्या-बसल्यासुद्धा) सहज मिळणारी, पूर्ण विश्रांती देणारी व हुशारी आणि हुरूप देणारी सुखावस्था […]