महती ज्ञानेश्वरीची

ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अलौकिक असा ग्रंथ आहे. त्याची महती सांगताना ज्ञानकोशकार डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश (२१वा विभाग) यामध्ये असे लिहिले आहे की, ‘‘ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील ‘काव्यारावो’  म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथे यादव कुलांतील राजे रामदेवराव हे देवगिरीस राज्य करीत असताना लिहिला. मराठी भाषेतील श्रीमद् भगवद्-गीतेवरील […]

‘तटस्थ’ तें ध्यान, विटेवरी !

तुकोबांनी विटेवरचे विठ्ठलाचे ते रूप सुंदर भासले, मनाला भावले आणि तुकोबा म्हणून गेले, सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । पण मुळात तुकोबांना विठ्ठलाचे हे ध्यान सुंदर वाटण्याचे एक कारण म्हणजे ते ध्यान स्थिर आहे, शांत आहे. ते विटेवर स्थिरपणे उभे आहे. ते हालत-डुलत नाही. ते निश्र्चल आहे. विटेवरच्या दोन पायांपैकी एक पाय मध्येच वर घेत […]