माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ असे विशेष नाव आहे. ह्या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेतही अतिशय महत्त्व आहे. ‘व्रतासाठी ही सप्तमी अरुणोद्यव्यापिनी घ्यावी’ – असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे. व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त (एक वेळ जेवून-) राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य होईल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करुन तो दिवा वाहत्या पाण्यात […]
